कोरोनाशी ज्या जिद्दीने, ईर्षेने आपण लढलो त्याच ईर्षेने स्वच्छतेसाठी लढा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Last Updated: Thursday 30th September 2021 09:20:23 AM


 पाणी व स्वच्छता याबाबत मुख्यमंत्र्यांचा राज्यातील सर्व सरपंचांशी संवाद

मुंबई दि. ३० : कोरोनाशी आपण ज्या जिद्दीने लढलो आणि त्याचे चांगले परिणाम समोर आले. त्याच ईर्षेने स्वच्छ महाराष्ट्र घडविण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व सरपंचांना केले. असे काम आपण केल्यास स्वच्छतेच्या बाबतीत राज्य देशात अग्रेसर ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियान अंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ‘सरपंच – पाणी व स्वच्छता संवाद’ उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वर्षा येथील समिती कक्षातून राज्यातील २७ हजार ८३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

या कार्यक्रमास नाशिक येथून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार श्रीमती सरोज अहिरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते तर वर्षा येथील समिती कक्षातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव अभय महाजन तसेच जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद उपस्थित होते. यावेळी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान काही सरपंचांनी आपले  मनोगत मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केले.

‘स्वच्छता हेच अमृत‘ हा नवा मंत्र

आपण देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना स्वच्छता हेच अमृत हा नवा मंत्र आहे हे ध्यानात ठेवून काम करा. वैयक्तिक स्वच्छता असेल तर रोगराईला वाव मिळणार नाही. त्यामुळे आपले आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छतेच्या माध्यमातून हे अमृत आपण मिळवा असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.

कोरोना परिस्थिती महाराष्ट्राने उत्तमरीत्या हाताळल्याबद्धल आपल्या सर्वांचे कौतुक करण्यात आले. आम्ही दिलेल्या सूचना आपण सगळ्यांनी पाळल्या त्याचेच हे फळ आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.

कचरा मुक्त आणि निरोगी गावे निर्माण व्हावीत

कोरोनामुक्ती बरोबरच कचरा मुक्त आणि निरोगी गाव अशा मिशनने आपण पुढे गेले पाहिजे. संत गाडगेबाबांनी जो संदेश दिला आहे तो अजूनही कालबाह्य झालेला नाही. त्यांनी आपल्याला काळाच्या पुढे पाहायला शिकवले. ते तेव्हा एकटे होते पण आज आपण सगळे आहात. प्रत्येक सरपंच जर गाडगेबाबा बनले तर गावांचे चित्र बदलेल. अनेक साधू, संतांची परंपरा आपल्याला लाभली आहे. त्याच भूमीत आपण सुद्धा जन्माला आलो आहोत. आपल्याला ती शिकवण घेऊन पुढे जायचे आहे. लोकांकडून त्या शिकवणीप्रमाणे करून घ्यायचे आहे. भावी पिढीने सरपंचाची आठवण काढली पाहिजे इतके चांगले काम आपण करून दाखवावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी व्यक्त केली.

विकासाची किरणे तळागाळापर्यंत पोहोचावी

‘हर घर नल, हर घर जल’ ही योजना सरपंचांनी राबवून ती यशस्वी करणे गरजेचे आहे. विकासाची किरणे तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजेत. आपण सर्व या व्यवस्थेचा पाठकणा आहोत. तुमच्या सूचना, सहभाग हा या योजनेचे यश ठरविणार आहे. विश्वासाने लोक आपल्याला निवडून देतात. गावांत रोजगार निर्माण व्हावा, छोटे मोठे व्यवसाय सुरू व्हावेत, एक आदर्श गाव निर्माण व्हावे. सरपंच हे एखाद्या झाडाच्या मुळांसारखे असतात. म्हणून हे मूळ भक्कम असण्याची गरज आहे.

पर्यावरण जपून विकास व्हावा

पर्यावरण बदलते आहे असे आपण म्हणतो पण याला आपणच कारणीभूत आहोत. गावागावातली कामे करताना पर्यावरणाचा विचार करून झाली पाहिजेत. विकासाच्या ध्यासापायी पर्यावरणाची हानी व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाऊ नये अशी अपेक्षा  मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

संकटे आली म्हणून डगमगून जाऊ नकाशासन सदैव आपल्या पाठीशी

आपण कोरोना सोबतच गेल्या दोन वर्षांपासून अनेक नैसर्गिक आपत्तींना समर्थपणे तोंड देत आहोत. परंतु आपण अजिबात डगमगू नका. यावर मात करण्याची ताकद आपल्यात आहे, खचून जाऊ नका. शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहे, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी आश्वस्त केले.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वच्छता ही सेवा, गावे हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करणे, सत्याग्रह से स्वच्छाग्रह रथयात्रा, स्वच्छता संवाद, स्थायित्व व सुजलाम अभियान इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून  सायकल रॅली, शालेय स्पर्धा, ऑनलाइन प्रश्नमंजुषा इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून गावागावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची वाढवून निकड बघून राज्यात १३ लाख ६० हजार शोषखड्डे बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्व सरपंचांच्या नेतृत्वातून व सक्रिय सहभागातूनच हे काम पूर्ण होऊ शकणार आहे.

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत २०२१-२२ या वर्षात २२ हजार १७३ गावांचे उद्दिष्ट ठेवले असले तरी १५ व्या वित्त आयोग अंतर्गत सर्व गावांमध्ये स्वच्छतेची कामे करावयाची आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत विकास आराखड्यात या कामाचा समावेश करणे अनिवार्य आहे. चालू आर्थिक वर्षात २ लाख १९ हजार वैयक्‍तीक शौचालय पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गोबर धन अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जलजीवन मिशन हा उत्सव; पुण्याचे काम

शासनाने हाती घेतलेले जलजीवन मिशन म्हणजे एक उत्सवाप्रमाणे आहे, एक यात्रा आहे. गावात पिण्याचे स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या आंदोलनात, उत्सवात राज्यातील सर्व सरपंचांनी सहभागी व्हावे, पाण्याच्या कामाकरिता एकजुटता दाखवावी असे आवाहनही पाणी पुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी केले.

सुंदरनगर (गडचिरोली) व कान्हेवाडी (पुणे) गावाच्या सरपंचांनी साधला संवाद

यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील सुंदरनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती जया मंडल तसेच पुणे जिल्ह्यातील चाकण तालुक्यातील कान्हेवाडी गावचे सरपंच भाऊसाहेब पवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधला. या दोन्ही सरपंचांनी आपल्या गावात सुरू असलेल्या श्रमदान, स्वच्छता विषयक उपक्रम, प्लास्टिक बंदी, पर्यावरण जपणूक विषयक केली जाणारी कामे याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे यांनी केले तर विभागाचे उपसचिव अभय महाजन यांनी आभार प्रदर्शन केले.

 

बातम्या

अधिनियम (कायदे)

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद – मंत्री गिरीष महाजन

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, कागदपत्रांच्या अटीतही बदल

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम पुस्तक (चौधरी लॉ पब्लिशर्स) 2024 latest आवृत्ती आता घरपोहच मिळेल

लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर - महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान; देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता

अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता

शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गांचा मोदी आवास घरकुल योजनेत समावेश; शासन निर्णय जारी – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेच्या अनुदानात वाढ

मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन

प्रत्येक ग्रामपंचायतीच्या भिंतीवर, माझी ग्रामपंचायत कॅलेंडर- माझी ग्रामपंचायत कॅलेंडर 2024 - बुकिंग सुरू

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संवेदनशीलतेने प्रयत्न करा – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी तीस दिवसांत ट्रू-व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक

ग्रामपंचायत इमारत बांधकामांसाठीच्या निधीत वाढ

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ मुलींना करणार लखपती

 "स्वच्छ गाव,सुंदर गाव,माझ गाव" या आभियानातुन चितळी पुतळी जि.जालना येथे स्वच्छता दिंडी व श्नमदानातुन स्वच्छतेची चळवळ

२ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

“एक तारीख एक तास” स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’ स्पर्धेत पाटगाव (जि.कोल्हापूर) ला राष्ट्रीय स्तरावर कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र

गावाच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’; शासन निर्णय जारी

कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ

प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील 2 महिलांना मिळणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता

ग्रामसेवक तानाजी धरणे यांची "हेलपाटा" कादंबरी लवकरच वाचकांच्या भेटीला,मान्यवरांकडून कौतुक

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा – राज्य निवडणूक आयुक्त

डिजिटल इंडियाला वेग देण्यासाठी ग्रामीण भागातील मनोऱ्यांकरिता मोफत जागा

प्रधानमंत्री आवास योजनेतील निवासी सदनिकांसाठी मुद्रांक शुल्क घटविले

स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार

थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान

७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

गावांमध्ये स्वच्छतेच्या सातत्यासाठी सरपंचांनी जनजागृती करावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

थेट सरपंचपदांसह ११६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान

साहित्यप्रेमी ग्रामसेवक मंच व माझी ग्रामपंचायत वेबसाईट द्वारा आयोजित राज्यस्तरीय लेख स्पर्धेचा निकाल जाहीर

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान-थेट सरपंचपदाचाही समावेश

स्वराज्य सप्ताह अंतर्गत १७ ऑगस्ट रोजी समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५०

सरपंच पदाची थेट निवडणूक; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ : ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जारी

ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील भूमिहीन लाभार्थींना जागा देण्याबाबत निर्णय

सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

राज्यात ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान “स्वराज्य महोत्सव”

‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’च्या माध्यमातून आता मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा

२७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला मतदान

एकाच दिवशी तब्बल २९ ग्रामपंचायतीनी केला विधवा प्रथेविरुद्ध ठराव

वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

राज्यात ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार

१५ ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

पंचायत विकास अधिकारी पद निर्मितीसाठी तज्ज्ञ समितीचे गठन – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

महा आवास अभियान २०२०-२१ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकरिता केंद्राचा दुसरा हप्ता प्राप्त – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर-उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात 17 ग्रामपंचायतींचा समावेश

बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या अनुदान रकमेत वाढ

जीवनविद्या मिशनच्या सहभागाने आता होईल ग्रामसमृद्धी – ग्रामविकास तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ

६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे – कृषिमंत्री दादाजी भुसे

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून १८ जानेवारीला मतदान

कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्य अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात मान्यता

ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना राबविण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितींची स्थापना – अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांची माहिती

कोरोनाशी ज्या जिद्दीने, ईर्षेने आपण लढलो त्याच ईर्षेने स्वच्छतेसाठी लढा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घ्यावे – राज्य निवडणूक आयुक्त

ऊसतोड कामगार बांधवांची नोंद पारदर्शक पद्धतीने व्हावी – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून युद्ध पातळीवर मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ

तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत संतश्रेष्ठ रामराव महाराज सभागृह बांधता येणार – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

ग्राम कृषी संजीवनी समित्या तातडीने गठित करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ राज्यात राबविणार

चांपा ग्रामपंचायतीतर्फे डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम

पथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा

रक्तदान यज्ञ करून वाहिली पत्नीला श्रध्दांजली; माजी ग्रामपंचायत सदस्याचा समाजापुढे वेगळा आदर्श

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

ग्रामपंचायत सुंबेवाडी येथे रक्तदान शिबीर संपन्न

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

नागपूर जिल्ह्यातील चांपा गावाने करून दाखवलं; गावातील ९०% टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

सरपंच दांपत्याचा अनोखा उपक्रम, लेकीच्या वाढदिवसाला केले वृक्षारोपन आणि रक्तदान !

केंद्र शासनाकडून नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार ग्रामपंचायतीचे कौतुक

ग्रामपंचायतींना पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता

गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास

कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत

कुंभेफळ गाव कोरोनामुक्तच राहणार- सरपंच कांताबाई मुळे यांनी व्यक्त केला विश्वास

ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात 400 रुपयांची वाढ

केंद्र शासनामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर

राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही